Skip to main content

Posts

Featured

KALCHACHNI

 ऐन परीक्षेच्या तोंडावरच येत्या फेब्रुवारीमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन कलचाचणी होणार आहे. या परीक्षेला मुख्याध्यापकांनी विरोध केला आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करायची की कलचाचणीची? असा सवाल उपस्थित करीत ही चाचणी नववीच्या परीक्षा संपल्यानंतर घेण्यात यावी, अशी मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे. उच्च शिक्षणातील आवड आणि करीअर अथवा व्यवसायाची निवड करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी, यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात येणार आहे. यात १५२ प्रश्‍न विचारले जाणार असून, सुमारे १ तास ही परीक्षा चालणार आहे. एसएससी बोर्डाकडे या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. फेब्रुवारीमध्ये कलचाचणी आणि त्यानंतर मार्चमध्ये दहावीची परीक्षा, असे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास करणार की कलचाचणीवर लक्ष केंद्रित करणार? असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.शाळांमध्ये संगणक आहेत का? ऑनलाइन कलचाचणीसाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये संगणक आहेत का? ते सुस्थितीत  आहेत का? याचे सर्वेक्षण एसएससी बोर्डातर्फे करण्यात येणार आहे. येत्या २३  डिस...

Latest posts